Posts

Showing posts from 2018

सख्या ...

हे असं अवखळपण , चंचलपण .. कधी  पानं , फुलं , तारे , कधी स्वप्नं वेचताना , हसून बघत होतास .. उतरणीवर कधी घसरले , तेव्हांही ,  गालात हसून , बोट दिलेस धरायला .. दुस्तर वाटेवर कधी कचरले तर , डोळ्यांनी धीर दिलास .. पाठीवर हात ठेवून , झुंजायला बळ दिलेस  .. हात सुटले हातातून , पण साथ नाही सरली , तू आहेसच खास , मागेपुढे ,  आसपास .. दिसला नाहीस कधी , पण जाणवतो तुझा वास .. आता जीर्ण झालीय श्वासांची माळ , जेव्हां ओघळेल  तेव्हां , असशील  ना  आसपास ... ?

विनंती ...

लाल कुंकू , हळद पिवळी , सुखी संसाराची सुबक रांगोळी ... रांगोळीत उमटली पावलं गौरीची , शिकल्या सवरल्या , जाणत्या लेकीची ... वेळ विवाहाची , सप्तपदी चालण्याची , मायेच्या  कोंदणात सुखस्वप्ने रेखायची ... आपणां सर्वांना विनंती आग्रहाची, अक्षतांच्या समवेत आशीर्वाद देण्याची ...

सख्या ..

किती  खात्री  असते , सगळं मुठीत असल्याची .. तरी , आयुष्य हातातून निसटतंच ....

सख्या ...

तू म्हणतोस , सारखं भांडण होतं आपलं .. तुझं मला पटत नाही , माझं तुला पटत नाही .. पाच दहा पंधरा वीस , चाळीस वर्षे होऊन गेली .. आता तर माझ्या मनातलंही वाचून , भांडतेस , उत्तरं देतेस तू ....            * * मी  म्हणते , मग काय झालं ? भांडलं तर कुठे  बिघडलं ? सारखे आपण एकत्र असतो , आपल्या या  चिमुकल्या खोपीत .. धारदार , टोकदार , अस्सल , आपली लयच वेगळी .. जवळ , आणखी जवळ येऊ , तर  कक्षा छेदणारच की  नाही ? अंतर  कमी  तर  घर्षण होईल , अंतर  वाढलेलं आपल्याला  चालेल ? ..

सख्या ...

तूच उगीच दुखवलंस , डोळ्यांत अश्रु उभे राहिले .. अश्रूंच्या आडून तुझं हंसू चमकलं , डोळ्यांत स्वप्नांचं इंद्रधनू  उमटलं .. चिडव , रडव किती  ते , रडणारच नाही ..ठरवून .. इंद्रधनूतली स्वप्नं , जातील  ना  ओघळून ....

सख्या ...

तू सांग , नाही तर , सांगू नकोस काही .. ते तुझ्या -माझ्यातलं, विरूनसं गेलंय कांही ... आठवतंय ना पाणंदीवर ? गवताच्या पात्यांवर , चमकणारं ते  दहिवर.. त्यांच्या चिमुकल्या आकाशात, सारं विश्व थरथरत राही .. त्यांत भिजत पावलं , तुझीही , माझीही .. तुझ्या ओल्या पावलांचा , आज माग सापडत नाही .. ते तुझ्या -माझ्यातलं , विरूनसं गेलंय काही .... किती  गूज करत , बसलो त्या कातळावर .. दाखवलं होतंस मला , ते रानफूल  लाजणारं.. खुडलं नाहीस  तूही , नाही खुडलं मीही .. कुठे दूर वाऱ्याबरोबर , उडून गेलं का तेही ? गंध मात्र माझ्याभोवती , अजून दरवळत राही ... तू सांग,  नाहीतर , सांगू नकोस काही .. ते तुझ्या माझ्यातलं , विरूनसं गेलंय कांही .......

सख्या ....

माझी वाट खाचा -खळग्यांची , तुझी  वाट  नागमोडी , अचानक भेटीची एक घडी .. अजुनी नुसताच धरलाय हात , नाही बोटांची गुंतागुंत , सोडून देऊ उशीर होण्याच्या आत .. नको वाटांची सांधेजोड , नको भावनांची पडझड , नको मनांची घडमोड .. नकोच ती तडातड , तू धर ऐलथड , मी धरते पैलथड .....

मैत्र ...

बंधनाच्या पलिकडे , एक नाते असावे .. नात्याला शब्दांचे , बंधन  नसावे ... प्रेमळ भावनांचा , त्याला आधार असावा .. दु:खाला तेथे थारा नसावा ... सुखाचा शिरवा , जिवाचा विसावा .. असा गोडवा , आपल्या मैत्रीत असावा ... मनातले न सांगता , तुझ्या पर्यंत पोचावे , न बोलताच तुझे शब्द , कानांवर  यावे ... ग्रीष्मात पाऊस पाडतील असे ढग असावे ... वाटेवर काटयांतूनही गुलाब फुलावे ... हात हाती नसले  , तरी सन्निध असावे .. डोळ्यांसमोर न संपणारे , एक स्वप्न असावे ... कोणती दिशा , कुठली वाट, गांव कोणतेही असावे .. आयुष्याच्या सीमेपार , मैत्र जीवाचे असावे ....

अनिवार ..

अनिवार पाणी , मिळाली वाट , तर वाहून जातं .. नाही मिळाली वाट  , तर सारं काही वाहून नेतं.....

वीण...

वीण काडी काडी ची .. वीण प्रेमाच्या  धाग्यांची .. वीण देहाची - मनाची .. वीण जन्म-जन्मांतरीची  ..

सत्य ...

सत्य  म्हणजे काय असतं , काय  असतं  सत्य .. असतं  तरी  का  सत्य , सत्य  कां  असतं ... जेवढं दिसतं डोळ्यांना , तेवढंच  सत्य  नसतं .. दृश्याच्या ही पलिकडे , सत्य  व्यापून  असतं ... नसतं सांगोवांगी.. वा नसतं कर्णोकर्णी.. श्रुतींच्या पल्याड  जातं , कवाडे  भेदुनी ... विश्वाचा गाभारा , आत परमात्मा धनी .. सत्य हुंकार  तयाचा , गूढ प्रणवाचा ध्वनी ....

उपनिषद चिंतन : - १२

        विषयांच्या  उदात्तीकरणा बरोबरच दुसरी एक कृती पांडुरंग शास्त्री  सांगतात ..ती  म्हणजे , विकारांचे  विभूतीकरण ..भक्ती  हाच जीवनाचा दृष्टिकोन आहे ..हे  सर्व  जगत्  ईश्वरमय   आहे .. जीवसृष्टी  व  जडसृष्टी ही  दोन्ही ही नमस्कारार्ह आहेत ..विषय  व विकार  ईश्वरमय आहेत ..हा दृष्टीकोण आला , की भक्ताला ही सारी क्रीडाच वाटते ..हे जग  जणू एक क्रीडांगण  आहे .... लोकवत् तु लीला कैवल्यम् । इथे  दादा  एक  छान  दृष्टांत देतात .. सर्व जगत् ईश्वरमय आहे , अशी धारणा झाल्यावर मग लाडू , जिलबी हे पदार्थ कसे बरे खाणार ? ..कारण लाडू म्हणजे भगवान ..  ही शंका विचारात घेऊनच उपनिषद सांगते , ' तेन त्यक्तेन भुंजीथा : ' म्हणजे , अहंकाराचा त्याग करूनच भोग भोगा .. तरच भोगात खरा आनंद मिळेल ..      लोकांना वाटतं की , जगात सुख आहे , पण ते भोगण्यासाठी दु:ख सहन करावे लागते ..सुखाच्या आजूबाजूला दु:ख आहे , म्हणून माणूस सुख हे दु :खाने  भोगतो ..पण गीता वेगळेच सांगते .. ' सुखेन  सुखमश्नुते ' .. सुखाने सुख भोगा ' .. वस्तुतः सुखांचा भोग घेण्याचा प्रयत्न करणे यात चूक  काहीच नाही ..पण

सख्या ..

        गच्च भरून आलेले आभाळ बघायला , दारापर्यंत  आले .... तू असे नको समजूस की , तुझी वाट बघायला , अशी उभी  राहिले .....

इवलीशी चिमणुली ...

रोज सकाळी , प्रभातफेरीच्या वेळी , बघत असे  मी ती , इवलीशी चिमणुली .. झुडपातल्या  घरट्यातून , डोकावून बघतेली , उडाया शिकवी तिला , साजुकशी माऊली .. बघता  बघता ,  भरारी  घेतली , उडाया शिकली , इवलीशी चिमणुली .. नाचाया शिकली , मुरकाया लागली , वयात  आली , इवलीशी  चिमणुली .. गोंडसशा चिमण्याच्या , नजरेत भरली , गिरक्या  घेई  , तिच्याच भवताली .. दुसरा एक हुंबाड , आला  तया वेळी , त्याच्याही मनामधी , भरली  चिमणुली .. चल  ग  ए  मुली , धमकी  अशी  दिली , गोंडस  चिमण्याची , हकालपट्टी केली .. नाजुकशी  चिमणुली , जरा नाही  भ्याली, भिरभिरून चोच त्याची , बोचकारून काढली .. इवल्याशा तळ्याच्या , काठावर आली , पंख , चोच पावले , साफसूफ केली .. घाबरून तळी , जवळ  नाही केली , असं  कधी शिकतील, माणसांच्या  मुली ? ?

उपनिषद चिंतन : - ११

       श्रीमत् शंकराचार्यांनी असा  सिद्धांत मांडला की हे  जग  असत् आहे ..World is unreal n changing .. हा सिद्धांत अगदी खराच आहे ..हे जग क्षणोक्षणी बदलते , तर त्याला खरे कसे बरे  मानता येईल ? ..जळणारी  ज्योती या क्षणी आहे ती दुसऱ्या क्षणी नाही , हे बौद्धिक दृष्टीने पटणारे आहे ..हेच त्यांनी  भावनात्मक रीतीनेही सांगितले आहे ..जसे ,  बालकाच्या हातात एखादे खेळणे आले , की ते त्यात एकाग्र होऊन जग विसरते , तसेच  भगवत्स्वरूपात जीव  एकाग्र होऊ लागला की भक्त जग विसरतो ..त्या ठिकाणी विश्व खोटे ठरते .समाधीच्या आनंदात रमून जाते ..म्हणूनच जगत् असत् आहे ,  हे आचार्यांचे विधान असत्य नाही ...         विकार वाईट  नाहीतच .. उलट  ते  जवळ  असायला  हवेत ..विषयांचे  व विकारांचे आपण इतके  उदात्तीकरण  करावे , की ते करता करता आपण सुंदर  होत जावे ..आपण  इतके  सुंदर  व्हावे , की भगवंताना  आपलेसे  व्हावे .. त्यांनी आपल्यासाठी विकारी  व्हावे ..त्यांना कधी  एकदा भक्ताला  भेटू , असे  व्हावे ..पुंडलिकाची  गोष्ट आठवते  ना ? .. त्याला  भेटण्यासाठी  भगवंत आले , तर मला वेळ  नाही  असे  सांगत , त्याने भगवं

उपनिषद चिंतन : - १०

      हीच गोष्ट  कामनांचीही ..काम , क्रोध हे  ही असायला  पाहिजेत ..कामनेमुळेच तर  जीवन पुढे सरकते ..व्यतीत  होते ..काम , क्रोध , मत्सर  हे असायलाच  पाहिजेत ..कामना ही  जीवनातील एक  अलौकिक गोष्ट  आहे ..पण तिचेही  उदात्ती- करण झाले  पाहिजे ..कामना प्रथम भोगकार्या साठी , नंतर परकार्यासाठी आणि  शेवटी  प्रभू - कार्यासाठी असायला  पाहिजे ..       क्रोध ही असायला  हवा ..सुरुवातीला स्वार्था साठी क्रोध , नंतर असत् कार्या विषयी क्रोध आणि शेवटी इंद्रियांविषयी  क्रोध निर्माण व्हावा .. ही आध्यात्मिक गोष्ट झाली ..यानंतर प्रभूवर क्रोध यावा ..संत भगवंताशी  झगडतात ..ते चित्ताची एकाग्रता करता  करता प्रगती  करतात .. त्यांना पूर्णतेचा अनुभव येईपर्यंत त्यांचे भगवंताशी गोड भांडण चाललेले  असते ..त्यांचा प्रभू वरचा  क्रोध मधुर  असतो ..चित्त  एकाग्र झाले नाही तर त्यांना राग  येतो ..असा  क्रोध असला पाहिजे..तो काही इतका वाईट  नाही .. तो क्षुद्र स्वार्थासाठी असेल तर वाईट  म्हणतात ..या क्रोधाचेही विभूती करण करायला  हवे ..उच्च स्थितीला पोचलेल्या लोकांना काम , क्रोध ,मोह हे  ईश्वरी प्रसाद वाटतात ..

उपनिषद चिंतन : - ९

      शब्द , स्पर्श , रूप , गंध इ  साऱ्या  विषयांतून आपल्याला सृष्टी जाणण्याची   उत्सुकता असते .. आपल्याला आपले नाव ऐकण्याची आवड असते. आपल्या स्त्रीचे , मुलांचे शब्द  ऐकण्याची इच्छा असते ..या  भावनेला उच्च स्तरावर न्या .. तिचे विभूतीकरण  करा ..मला शब्द ऐकायचा आहे , पण कुणाचा ?  गुरूचा  , संतांचा , भगवंताचा .. त्यांच्या शब्दांत शक्ती , प्रेरणा आहे ..        असेच स्पर्शाचेही उदात्तीकरण व्हायला हवे .. सदोदित  केवळ पत्नीस्पर्शाची अपेक्षा ठेवू नका . भावस्पर्शात फार मोठी शक्ती आहे ..गुरुस्पर्श व  भावस्पर्श यात फार मोठी शक्ती आहे ..त्यांची अपेक्षा ठेवा .. मृत्युशय्येवर पडलेल्या व्यक्तीलाही स्पर्शाची अपेक्षा असते .. स्पर्श दोन प्रकारचा असतो ..विकारजन्य व भावजन्य .. विकारजन्य स्पर्शाचे उदात्तीकरण करुन त्याचे रूपांतर भाव जन्य स्पर्शात व्हायला पाहिजे ..शब्द व  स्पर्श हे भगवंताने निर्माण केलेले असल्यामुळे त्यांना वाईट म्हणणे म्हणजे  भगवंतालाच नांवे ठेवण्या सारखे आहे ..अशा व्यक्तीचा जीवन -विकास कसा बरे  होणार ? ..        आपल्याला रूप पाहण्याचीही इच्छा होते .. आपण  कसेही असलो तरी आ

उपनिषद चिंतन : - ८

         सर्व विश्व ईश्वरमय आहे हे ज्ञान आहे , पण अनुभव नसल्याने आपल्याला विषय व विकार हे भयंकर वाटतात .. या विषयांना व विकाराना ही ईशावास्यम माना असे प्रतिपादन करण्याचे सामर्थ्य फक्त वेदांमध्येच आहे ..गीता सांगते : - धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मि भरतर्षभ ॥  गीतेने  यात कामाचा स्वीकार केला आहे , त्याला विभूती मानण्यास सांगितले  आहे ..कारण , हे  विषय व विकारही भगवंतानेच निर्माण केले आहेत..त्याने ते  निर्माण करुन जीवाला कृतार्थ बनविले आहे .. भगवंतापासून वेगळे झाल्यावर ते चैतन्य कोठल्या आधारावर जगणार?त्याचे जीवन कसे चालणार? यासाठी भगवंताने ही खेळणी दिली आहेत ..          विषय आणि विकार यांचा तिरस्कार करुन ते  जाणार नाहीत ..त्यांना भगवंताने निर्माण केले आहे , म्हणून ते सुंदर आहेत ..त्यांचीही आपणास गरज आहे ..नको  म्हणून ते जाणार नाहीत.. ते  विषय आहेत हे समजूनच त्यांचे सेवन करायला पाहिजे ..       हे जगत कोणाचे ? भगवंताचे ..मी कोणाचा ? भगवंताचा .. तसेच हे विषय व विकार भगवंताने निर्माण केलेले असल्यामुळे , त्यांची निर्भत्सना करुन चालणार नाही .. जे ती करतात त्यांना या जगाचे रह

उपनिषद चिंतन : - ७

       या  भोगसंबंध आणि  भाव संबंधांचे पूज्य  दादांनी फारच सुंदर स्पष्टीकरण केले आहे ... एखाद्या मोगऱ्याच्या झाडावर सुंदर  फुले  फुलली असावीत ..त्यांच्या  केवळ  किमतीचा विचार हा भोग संबंध झाला ; पण त्या सुगंधी फुलांच्या  सुवासाने  अतीव आनंद होणे हा त्या झाडाशी असलेला भाव संबंध झाला .. याच्याही पुढची  पायरी म्हणजे , त्या सुंदर , सुवासिक  फुलांच्या निर्मिती मागचा भगवंताचा हात आठवणे हा त्या झाडाशी व भगवंताशी असलेला भक्तीसंबंध होय .           वृक्ष आणि वानर यांची भारतात भगवान म्हणून पूजा होते ..मात्र पाश्चात्य लोक  याबद्दल आपला उपहास करतात ,कारण ते लोक याच्या मुळाशी असलेला श्रद्धा भाव लक्षात घेत नाहीत.. आपण वड-पिंपळाच्या झाडांना नमस्कार करतो.. याच्या मागे आपला विशिष्ट दृष्टिकोण  आहे .. आपण जगाचे दोन भाग पाडले  आहेत ..एक जडसृष्टी आणि दुसरी जीवसृष्टी .. जगत या शब्दात जड व जीव या दोहोंचा समावेश होतो .. जड पदार्थ व जीव दोन्ही ईश्वरमय आहेत ..याच साठी सर्व  जीवनच ईश्वरमय आहे , अशी  दृष्टी यायला  पाहिजे ..         

उपनिषद चिंतन : - ६

         आत्मनिष्ठ व वस्तुनिष्ठ विचारप्रवाहाला उपनिषद  उत्तर  देते, मीही ईश्वर व सृष्टीही ईश्वर .. हा मंत्र असे सांगतो की , हे जगत ईश्वराचे आवास स्थान आहे ..यत्किंच जगत्यां जगत । ..जगत म्हणजे काय ? ..तर , गच्छति इति जगत । ..जे परिवर्तनीय असते ते जगत ..कोण बदलते ? ..तर जीव व जड पदार्थ बदलतात .. जड पदार्थाच्या मूळ स्वरूपात विकार होतो .. तर ज्ञानाच्या कमी- अधिक प्रमाणाने जीव  बदलतो ..ह्या  दोन्ही  विकारी गोष्टी जगत या शब्दात अभिप्रेत आहेत .. या सृष्टीत जे जे विकारी आहे , ते ते भगवंताचे आवास स्थान आहे ..म्हणजे  जड  व जीवा बरोबरच सृष्टीत ईश्वर राहतो .हे सारे विश्व चैतन्याने भरलेले आहे ..         आता  वैज्ञानिकही याच निष्कर्षाला येऊन पोचले  आहेत ..त्यांच्या मते जगात सारे चैतन्यच (spirit)आहे ..अणुअणूत चैतन्य भरले  आहे .. काही गोष्टीतील चैतन्य वेगळेही करता  येते .जशी energy ..शंकराचार्यही हेच  सांगतात ..वासुदेवं जगत सर्वं । ..जग वासुदेवस्वरूप आहे ..सृष्टी ही ईश्वरस्वरूप आहे ..म्हणूनच सृष्टी  उपभोग्य नसून वंदनीय आहे ..सृष्टीशीही तीन प्रकारे संबंध असू शकतो ..भोग संबंध, भाव संब

उपनिषद चिंतन : - १

ॐ ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत । तेन त्यक्तेन भुँजीथा:मा गृध: कस्यस्विद्धनम ॥१॥ अन्वयार्थ : -  जगत्यां  - अखिल ब्रह्मांडात यत्किंच  - जे काहीही जगत  - जड, चेतनरूप जग  आहे  ते इदं सर्वं  - ते  सर्व ईशावास्यम - ईश्वराने व्याप्त आहे (म्हणून ) तेन - ह्या ईश्वराचे (स्मरण करीत ) त्यक्तेन भुँजीथा: - त्यागपूर्वक भोगा मा गृध: - त्यांत  आसक्त होऊ  नका (कारण ) धनं कस्य स्वित् - कोणाचे  आहे ? - अर्थातच कोणाचेच  नाही ..म्हणून कोणाच्याही धनाबद्दल आसक्ती ठेवू  नका ..

उपनिषद चिंतन : - ५

       मात्र उपनिषदांत मांडलेली विचारधारा पूर्ण आहे ..उपनिषद सांगते , ' पूर्णमद: पूर्णमिदम।'   मी आणि जगत या दोघांचाही एकदम विचार करायला हवा ..कारण , मी पण श्रेष्ठ व ही सृष्टीही  श्रेष्ठ ..मी व सृष्टी यांच्यातील संघर्षच शास्त्रकारांनी नाहीसा केला आहे ..मी ईश्वर आहे , पण वस्तूला तुच्छ म्हणण्याचा मला अधिकार नाही , कारण ही सृष्टीही ईश्वर आहे ..म्हणून कोणीही हीन वा हलके नाही ..         आत्मनिष्ठ व वस्तुनिष्ठ या दोन्ही विचारधारा अपूर्ण व अर्धसत्य आहेत ..आत्मनिष्ठ हे भक्त खरे पण अर्धभक्त आहेत ..ज्यांनी ईशावास्यम विचार स्वीकारला ते पूर्णभक्त होत ..मी पूर्ण व सृष्टीही  पूर्ण हे ईशावास्याचे रहस्य आहे ..आपल्या वैदिक  संस्कारातही हाच विचार आढळतो ..       सर्वेषामविरोधेन ब्रह्मकर्म समाचरेत ।      वस्तूला प्रभुरूप माना , निदान वस्तू ही प्रभूची माना .ही सृष्टी  ईश्वराने का निर्माण केली तर , ' लोकवत्तु लीला कैवल्यम । ' लीलेचा हेतू आहे .. क्षुद्र , अपवित्र किंवा स्वार्थी हेतू नाही ....

उपनिषद चिंतन : - ४

         आजकाल  तर आपण माणसेही आपल्यात नीटपणे बोलत नाही ....तसे खूप बोलतो , पण अंतःकरणापासून बोलत नाही ..हृदयाने कोणाशी तरी बोलणे ही वेगळीच गोष्ट आहे ...भाव जीवन जगणाऱ्याशी  संपूर्ण सृष्टी बोलते ..          आत्मनिष्ठ जीवन  जगणाऱ्या लोकांना हे उपनिषद मार्गदर्शक आहे .. ..ते सांगते , ' मीही ईश्वर आणि सृष्टीही  ईश्वर .. ..आज जगात  दोन प्रकारचे विचार -प्रवाह आहेत ..आत्मनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ ..subjective आणि objective .. आत्मनिष्ठ विचार स्वतःला प्राधान्य देतो ...मी आणि सृष्टीत मी मोठा ..सृष्टी  आणि  संस्कृती माझ्यासाठी  आहे ..तिला मारूनही मी जगेन .. तसेच समाज व देशही माझ्यासाठी आहे .त्यांच्या साठी मी मरायला  तयार नाही ..        दुसरा वस्तुनिष्ठ  विचार हा लेनिन सारख्या महान लोकांचा आहे ..तो म्हणतो , ' समाजातून व्यक्ती निर्माण झाली आहे ..म्हणून समाज , देश , राष्ट्र यांच्यासाठी  बलिदान केले  पाहिजे..' पृथ्वी साठी आत्म्याचा , स्वतःचा त्याग करावा असे ही विचारधारा सांगते , तर आत्मनिष्ठ विचारधारा म्हणते  - आत्मार्थे पृथिवी त्यजेत ।        आत्मनिष्ठ विचार स्वतःला प्राध

उपनिषद चिंतन : - ३

          भोगवादी जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या मस्तकात भोग भरलेला असतो ..त्याला सृष्टीत  भोगाशिवाय काहीच दिसत नाही ..राक्षस असतो आपल्यापैकीच , फक्त त्याचा दृष्टिकोण भोगवादी असतो ....अशा वृत्तीचे लोक वेदांचा अभ्यास करतात , पण तो भोगासाठी ,भागवत सप्ताह करतात , तो पैशासाठी ..अशा व्यक्तींना ही सारी सृष्टी आपल्याच भोगासाठी आहे , असे वाटते ..हे लोक या उपनिषदाचे वाचन करतील , तर नैतिक बनतील ..           जे लोक भावप्रधान आहेत , त्यांच्याशी ही सृष्टी बोलेल ..आपल्या प्राचीन मुनींना पर्वत पाहून स्थिरता मिळाली , पालवीकडे पाहून कोमलता मिळाली व सागराकडे पाहून गंभीरता मिळाली .. यासाठी कोणतीही शाळा नव्हती .. ही भावदृष्टी आहे .. सृष्टी  आपल्याला ज्ञान देते ..उपनिषदे सांगतात  की , सृष्टी  पाहून माणूस ज्ञानी होतो ...

उपनिषद चिंतन : - २

ईश +आवास्यम -ईशावास्यम अशी  या  शब्दाची  फोड  आहे ..एक  तर, ईश्वराने हे  जग आच्छादि त झाले  आहे , किंवा भक्तांनी ईश्वरी भावाने जग झाकले  आहे ..खरंच या सृष्टीत  भगवान  आहेत  का ? ..तर , होय ..भगवान सर्वव्यापी आहे ..हे जग त्यांनी  निर्माण केले  आहे ..आपल्या  प्रेमाने  हे जग झाकून टाकले आहे ..शिवाय त्यांनी या सृष्टीत प्रवेश केला आहे ..ह्यात भक्तांचे ईश्वर प्रेम दिसते ..म्हणजेच , ईशावास्यम मध्ये ईश्वराचे सृष्टी वरील व भक्तांचे ईश्वरा वरील प्रेम दिसते ..या जगातल्या  अणुरेणूत , अंतर्बाह्य भगवान आहेत.. या  उपनिषदाचा असा दृष्टिकोन आहे , की ह्या  जगात भगवान राहतो , तो  तटस्थही नाही आणि  वेगळाही नाही...        हे  उपनिषद वाचल्याने भोग-जीवन जगणा रा माणूस नैतिक होईल ,भाव -जीवन जगणाऱ्या  माणसाशी सृष्टी बोलेल व आध्यात्मिक जीवन  जगणाऱ्याला मार्गदर्शन मिळेल ...  

आभा ...

स्वतःबद्द्लचा अभिमान हे रागाचे कारण आहे .. मनात कधीही कसल्याही कारणाने राग ठेवू नये.. राग राग करून आपण स्वतःची मन:शान्ति बिघडवतो .. आपण आपला भलेपणा घालवतो .. मनाचा मोठेपणा नेहमी ठेवावा , अभिमान त्यागावा .. कोणालाही  प्रथम माफ़ करावे .. माफ केल्याने सर्व गुंता सुटतो नाहीतर सगळेच किचकट होवून जाते .. मनात सगळी जळमटे वाढतात , माफ़ केले तर सगळे मोकळे मोकळे होते .. मनाचे आभाळ निरभ्र होत ... स्वतः ला मन:शान्ति मिळते .. सुप्रभात ........आभा घोटणे

प्रेम ..

रुमी म्हणतो , प्रत्येक धर्मात प्रेम आहे , पण प्रेमाला मात्र धर्म नाही .. अरे , प्रेमालाही धर्म आहे .. ज्याला तो कळला , तो झऱ्या सारखा वाहत गेला , किनाऱ्यावर प्रेम उधळीत ... त्यालाही भेटली प्रेमाची सरिता .. प्रेमाचा धर्म पाळता पाळता , दोघे विलीन झाले परस्परांत , प्रेमाच्या विशाल सागरात.. आपलेच प्रतिबिंब पाहत , नभाच्या आरशात .. तुझ्यात , माझ्यात .. त्याच्यात , तिच्यात ....

विंदा ...

आषाढी एकादशी निमित्त खास- पंढरपूरच्या वेशी बाहेर एक आहे छोटी शाळा.. सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा... दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय ? न जाणो , असेल ' विठ्ठल '... --विंदा करंदीकर