उपनिषद चिंतन : - ११

       श्रीमत् शंकराचार्यांनी असा  सिद्धांत मांडला
की हे  जग  असत् आहे ..World is unreal n
changing .. हा सिद्धांत अगदी खराच आहे ..हे
जग क्षणोक्षणी बदलते , तर त्याला खरे कसे बरे  मानता येईल ? ..जळणारी  ज्योती या क्षणी आहे
ती दुसऱ्या क्षणी नाही , हे बौद्धिक दृष्टीने पटणारे
आहे ..हेच त्यांनी  भावनात्मक रीतीनेही सांगितले
आहे ..जसे ,  बालकाच्या हातात एखादे खेळणे आले , की ते त्यात एकाग्र होऊन जग विसरते , तसेच  भगवत्स्वरूपात जीव  एकाग्र होऊ लागला
की भक्त जग विसरतो ..त्या ठिकाणी विश्व खोटे
ठरते .समाधीच्या आनंदात रमून जाते ..म्हणूनच
जगत् असत् आहे ,  हे आचार्यांचे विधान असत्य
नाही ...
        विकार वाईट  नाहीतच .. उलट  ते  जवळ 
असायला  हवेत ..विषयांचे  व विकारांचे आपण
इतके  उदात्तीकरण  करावे , की ते करता करता
आपण सुंदर  होत जावे ..आपण  इतके  सुंदर  व्हावे , की भगवंताना  आपलेसे  व्हावे .. त्यांनी
आपल्यासाठी विकारी  व्हावे ..त्यांना कधी  एकदा
भक्ताला  भेटू , असे  व्हावे ..पुंडलिकाची  गोष्ट
आठवते  ना ? .. त्याला  भेटण्यासाठी  भगवंत आले , तर मला वेळ  नाही  असे  सांगत , त्याने
भगवंतांना विटेवर तिष्ठत उभे ठेवले ..
        भक्तीशास्त्रातील ही  एक  विलक्षण  अवस्था
आहे .. जेव्हां जीवाला भगवंताला  भेटण्याची
आतुरता  असते , त्यावेळी भगवंत निर्विकार असतात ..साधनेने जीव हळूहळू निर्विकारी होतो .
आणि मग त्याला भेटण्यासाठी भगवान  अधीर
होतो ..मात्र जीव तितकाच शांत असतो ..त्याला
भगवंताला  भेटायला वेळ नसतो ..देव  नि  भक्त
यांच्यातील ही  एक क्रीडा आहे ..

Comments

Popular posts from this blog

सख्या...

सख्या ...

चिटुकली?....