तू म्हणतोस , सारखं भांडण होतं आपलं .. तुझं मला पटत नाही , माझं तुला पटत नाही .. पाच दहा पंधरा वीस , चाळीस वर्षे होऊन गेली .. आता तर माझ्या मनातलंही वाचून , भांडतेस , उत्तरं देतेस तू .... * * मी म्हणते , मग काय झालं ? भांडलं तर कुठे बिघडलं ? सारखे आपण एकत्र असतो , आपल्या या चिमुकल्या खोपीत .. धारदार , टोकदार , अस्सल , आपली लयच वेगळी .. जवळ , आणखी जवळ येऊ , तर कक्षा छेदणारच की नाही ? अंतर कमी तर घर्षण होईल , अंतर वाढलेलं आपल्याला चालेल ? ..