सख्या..

 कधीकधी, असं वाटतं,

उगीच, उगीच उजाडतं..

ती गूढरम्य वाट संपून,

एक्दमच पोहचून जातो..

ते स्वप्न गूढ सुंदर,

ती वाट मऊ धूसर,

उगवता सूर्य सगळंच,

चक्क उजळून टाकतो...

नकोच स्वप्न भंगणं,

नकोच ते  उजाडणं,

शेवटी दुस्तर वाटेवर,

अडखळत चालणं.....

Comments

Popular posts from this blog

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - २